४/५/६ जानेवारी
२०१३ रोजी आम्ही कात्राबाई शिखराच्या पश्चिम दिशेने ४५०० फुटांवरून थेट कोकणात
उतरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात खोल दरीचा शोध लावला. तसेच कोकणातून डेहेणे
गावातून रतनगडावर (आता कोसळलेल्या) १२ पायऱ्यांच्या मार्गाने वर येणारी पुरातन वाट
शोधून काढली. त्याचा हा वृत्तांत ...!!
डिसेम्बर मध्ये ट्रुई व क्रिस्टी या दोन फिरंगी हिरकण्यांबरोबर अरुणसर, प्रकाशसर व शंतनूसर यांचेबरोबर मी कुरंगगड, अलंगगड, मदनगड, व रतनगड या ट्रेकला गेलो होतो. रतनगडावर फेरफटका मारत असताना सोबत असलेल्या सामरद गावातील गोपाळ मामांनी रतनगडच्या पुरातन १२ पायऱ्यांच्या रस्त्याची कल्पना दिली आणि ती खिंड दुरून दाखवीली. तेव्हा अरुण सरांनी सांगितले की पूर्वीच्या काळी रतन गडावर येण्यासाठी पायऱ्यांच्या एकूण तीन वाटा होत्या. पैकी सध्या दोन पायऱ्यांच्या वाटाच शिल्लक आहेत. साधारण १०० वर्षांपूर्वी एक वाट कोसळून गेली. तिथे आता सरळ कडा आहे. कोकणातून डेहेणे वरून येणारी १२ पायऱ्यांची वाट या कोसळलेल्या पायऱ्यांना मिळायची. अंदाजे ३ वर्षांपूर्वी इथून तुटलेल्या पायऱ्यांच्या कड्यावरून दोराच्या साह्याने (Rappelling) करून आम्ही खाली उतरलो होतो. तेव्हा डेहेणेला जाणारा रस्ता केव्हातरी शोधायचे ठरविले होते.हे सर्व बोलणे चालू असताना अरुण सरांनी समोरच असलेला कात्राबाई आणि आजोबाचा डोंगर दाखवला. ही दोन्ही शिखरे अजस्त्रच आहेत.त्यात कात्राबाईच्या डोंगराची एक घळ जी रतनगड वरून बघितली तर कात्राकड्याच्या उजव्या अंगाला दिसते, “ती घळ पुढील महिन्यात आपल्याला उडवायची आहे” असे अरुण सरांनी सांगितले. पण ह्या वेळी मी थोडा निराशच होतो. कारण मला काही या मोहिमेला यायला जमणार नव्हतं. माझे ठरलेच तर यायत्या वेळेला माझी मोटर सायकल घेवून येवू शकेन असे मी अरुण सरांना सांगितले.
४/५/६ जानेवारी या तारखा निश्चित झाल्या. पण अखेरच्या दिवसापर्यंत माझ काही खर दिसत नव्हतं. त्याच दिवसी सकाळी काही ट्रेकर मंडळीशी फोनवरती चर्चा झाली आणि मला जोर आला. आत्ता काही झाल तरी जायाच ...! मग लगेच अरुण संराना फोन केला, सर मी येतोय. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. अरुण सरांची कार फुल झाली होती. मग काय दुचाकी जिंदाबाद...! झेनोश पटेल ची बुलेट होतीच. ३ जानेवारी ला रात्री ९ वाजता आम्ही जोगेश्वरी मधून निघालो अरुण सर, प्रकाश सर, कार मधून निघाले. पुढे ठाण्याच्या जवळपास राज बाकरे (प्रसिध्द प्रस्तारोहक) त्यांना सामील झाला. माझ्याबरोबर कुणाल आंबेरकर होता. झेनोष पटेल आणि प्रसाद सामंत हे कल्याण भिवंडी फाट्या जवळ एकत्र भेटले.
रात्रीची थंडी अंगाला चांगलीच झोंबत होती. कासारा घाटाच्या तळाला एका टपरीत चहा कॉफी घेवून आम्ही पुढे सामारदच्या दिशने निघालो. रात्रीच्या २:३० च्या सुमारास आम्ही सामारद गावात पोहोचलो. बेफाट थंडी मुळे झोप काही लागली नाही ...!
डिसेम्बर मध्ये ट्रुई व क्रिस्टी या दोन फिरंगी हिरकण्यांबरोबर अरुणसर, प्रकाशसर व शंतनूसर यांचेबरोबर मी कुरंगगड, अलंगगड, मदनगड, व रतनगड या ट्रेकला गेलो होतो. रतनगडावर फेरफटका मारत असताना सोबत असलेल्या सामरद गावातील गोपाळ मामांनी रतनगडच्या पुरातन १२ पायऱ्यांच्या रस्त्याची कल्पना दिली आणि ती खिंड दुरून दाखवीली. तेव्हा अरुण सरांनी सांगितले की पूर्वीच्या काळी रतन गडावर येण्यासाठी पायऱ्यांच्या एकूण तीन वाटा होत्या. पैकी सध्या दोन पायऱ्यांच्या वाटाच शिल्लक आहेत. साधारण १०० वर्षांपूर्वी एक वाट कोसळून गेली. तिथे आता सरळ कडा आहे. कोकणातून डेहेणे वरून येणारी १२ पायऱ्यांची वाट या कोसळलेल्या पायऱ्यांना मिळायची. अंदाजे ३ वर्षांपूर्वी इथून तुटलेल्या पायऱ्यांच्या कड्यावरून दोराच्या साह्याने (Rappelling) करून आम्ही खाली उतरलो होतो. तेव्हा डेहेणेला जाणारा रस्ता केव्हातरी शोधायचे ठरविले होते.हे सर्व बोलणे चालू असताना अरुण सरांनी समोरच असलेला कात्राबाई आणि आजोबाचा डोंगर दाखवला. ही दोन्ही शिखरे अजस्त्रच आहेत.त्यात कात्राबाईच्या डोंगराची एक घळ जी रतनगड वरून बघितली तर कात्राकड्याच्या उजव्या अंगाला दिसते, “ती घळ पुढील महिन्यात आपल्याला उडवायची आहे” असे अरुण सरांनी सांगितले. पण ह्या वेळी मी थोडा निराशच होतो. कारण मला काही या मोहिमेला यायला जमणार नव्हतं. माझे ठरलेच तर यायत्या वेळेला माझी मोटर सायकल घेवून येवू शकेन असे मी अरुण सरांना सांगितले.
४/५/६ जानेवारी या तारखा निश्चित झाल्या. पण अखेरच्या दिवसापर्यंत माझ काही खर दिसत नव्हतं. त्याच दिवसी सकाळी काही ट्रेकर मंडळीशी फोनवरती चर्चा झाली आणि मला जोर आला. आत्ता काही झाल तरी जायाच ...! मग लगेच अरुण संराना फोन केला, सर मी येतोय. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. अरुण सरांची कार फुल झाली होती. मग काय दुचाकी जिंदाबाद...! झेनोश पटेल ची बुलेट होतीच. ३ जानेवारी ला रात्री ९ वाजता आम्ही जोगेश्वरी मधून निघालो अरुण सर, प्रकाश सर, कार मधून निघाले. पुढे ठाण्याच्या जवळपास राज बाकरे (प्रसिध्द प्रस्तारोहक) त्यांना सामील झाला. माझ्याबरोबर कुणाल आंबेरकर होता. झेनोष पटेल आणि प्रसाद सामंत हे कल्याण भिवंडी फाट्या जवळ एकत्र भेटले.
रात्रीची थंडी अंगाला चांगलीच झोंबत होती. कासारा घाटाच्या तळाला एका टपरीत चहा कॉफी घेवून आम्ही पुढे सामारदच्या दिशने निघालो. रात्रीच्या २:३० च्या सुमारास आम्ही सामारद गावात पोहोचलो. बेफाट थंडी मुळे झोप काही लागली नाही ...!
सकाळी यशवंताच्या
पडवीत चहा नाश्ता करून साधारण ८ च्या सुमारास आम्ही कात्राबाईच्या दिशने चालायला
सुरवात केली. आमच्या बरोबर गोपाळ मामा होते. रतनगड ला डाव्या अंगाला ठेवून आम्ही
कात्राबाईच्या खिंडीत जाणार आहोत याची मला कल्पना होती. १० वाजता आम्ही
रतनगदाखालील चौफुल्यावर येऊन पोहोचलो. तिथे थोडा दम टाकला.
प्रत्येकाच्या
पाठीवर ओझे थोडे जास्तच होते. ३५० फुटांचा मोठा दोर, इतर छोटे छोटे दोर, हार्नेस, क्यार्याबिनर, म्हणून अरुण सरांनी कात्राबाईच्या
खिंडीत पोहोचलेल्या साबळे मामांना फोन केला आणि तुमच्या बरोबर असणाऱ्या
गावकऱ्यांना इकडे थोड रतनगडाच्या दिशने पाठवा आमच्याकडे वजन खूप आहे असे सांगितले.
साबळे मामा आदल्या दिवशीच सावळेराम आणि बजरंग हयांना बरोबर घेऊन खिरेश्वर - पाचनई
मार्गे कुमशेतला येउन राहिले होते. सकाळी लवकर निघून कात्राबाईच्या मंदिराजवळ
येवून थांबले होते. आम्ही रतनगडच्या खाली असलेल्या पाण्याच्या टाक्यामधून पाणी
भरून घेतले.
आत्ता पुढे कुठे पाणी मिळण्याची शक्यता कमी होती. थोड्याच वेळात सावळेराम व बजरंग यांची भेट झाली. चला ... सामानाचे ओझे थोडे कमी झाले. नशिबाने वाटेल थोडेसे पाझरणारे पाणी लागले. तिथे आम्ही जेवण उरकून घेतले. चपाती, कोबीची भाजी, डांगर, लसणीची चटणी, लोणचे..!
१ वाजला होता. लवकरच आम्ही कात्राबाई पास च्या मंदिरा जवळ पोहोचलो. जिथे साबळे मामा आमची वाट बघत होते. सार्वजण तिथला परिसर न्याहाळत बसले. ज्या दिशने आम्ही आलो त्या दिशेला रतन, मदन, अलंग, कळसुबाई ची रंग दिसत होती. तर समोर आजोबा, हरिश्चंद्रगड, नाफता आदी पर्वत शिखरे दिसत होती. डाव्या अंगाला घनचक्कर तर उजव्या अंगाला रतनगड. अरुणसरांचे सर्व काही तोंडपाठ होते. त्यांचेबरोबर असल्यावर आपल्या ज्ञानात खूपच भर पडते.
रतन वाडीतून कुमशेत कडे जाणाऱ्या एका
गावकऱ्यांने सांगितले की तुम्ही असेच डाव्या अंगाने वर जा म्हणजे खालच्या अंगाला
तुम्हाला पाणी मिळेल. मग आम्हाला थोडा धीर आला. आम्ही साबळे मामाच्या मागून सर्व
पुढे चाले होते. पाण्याचा साठ कुठे दिसतोय का ते बघत होतो. पण कसले काय ...
आम्हाला कुठेही पाणी सापडले नाही. दोन तास फुकट गेले. शेवटी आम्ही कात्राबाईच्या
दुसऱ्याच टोकाला येवून थडकलो. तिथून रतनगडाचा थोडासा भाग दिसत होता. आत्ता बराच
वेळ वाया गेला होता. मुख्य म्हणजे आम्हाला ती घळ शोधायची होती. जीच्यातून आम्हाला
उद्या उतरायचे होते.
आम्ही सर्व रतनगडाच्या दिशेने वरती गेलो. अरुणसर, साबळे मामा, प्रसाद, मी आणि सावळेराम त्या घळीच्या दिशेने जात होतो तेव्हा अरुण सरांची नजर एका दगडाच्या खाचीत पडली. त्या दगडाच्या भेगेमध्ये एक छोटासा खड्डा होता. त्याच्यामध्ये पाणी होते.(एखाद्या माणसाची नजर किती तीक्ष्ण असते हे त्याच उत्तम उदाहरण). मी बाजूलाच होतो. लगेच मला अरुण सरांनी बोलवून ते पाणी दाखवले. आम्हा सर्वांचाच जीव भांड्यात पडला. आम्हाला पाण्याचा शोध लागला होता.
आम्ही सर्व रतनगडाच्या दिशेने वरती गेलो. अरुणसर, साबळे मामा, प्रसाद, मी आणि सावळेराम त्या घळीच्या दिशेने जात होतो तेव्हा अरुण सरांची नजर एका दगडाच्या खाचीत पडली. त्या दगडाच्या भेगेमध्ये एक छोटासा खड्डा होता. त्याच्यामध्ये पाणी होते.(एखाद्या माणसाची नजर किती तीक्ष्ण असते हे त्याच उत्तम उदाहरण). मी बाजूलाच होतो. लगेच मला अरुण सरांनी बोलवून ते पाणी दाखवले. आम्हा सर्वांचाच जीव भांड्यात पडला. आम्हाला पाण्याचा शोध लागला होता.
थोडे पुढे
चालल्यावर ती घळ पण आम्हाला सापडली. अगदी त्या अचानक सापडलेल्या पाण्याच्या
साठ्यापासून अवघ्या पाच मिनिटांवर. त्याघळीचे पात्र मात्र प्रचंड दिसत होते. मी तर
जर हबकूनच गेलो. माझ्या अनुभवानुसार आत्तापर्यंतची ही सर्वात उंचीवरून सुरु होऊन
सर्वात खोलवर जाणारी घळ असावी बहुतेक.सूर्य अस्ताला जाण्याची वेळ जवळ आली होती.
लवकरात लवकर आम्हाला राहण्याच्या जागेची सोय करायाची होती. मग मागच्या मंडळीना
पाणी आहे ती खुश-खबर देवून मी राहण्याच्या जागी घेऊन आलो. अरुणसर, साबळेमामा, सावळेराम, बजरंग जेवणाच्या तयारीला लागले. त्यांनी
गर्द झाडीत छान पैकी चूल मांडली. अरुण सरांच्या हाताचे सूप प्यायला खरोखर भाग्य
लागते. अप्रतिम बनवतात. या थंडीमध्ये सूप पिण्याची मजा काही औरच आहे. जेवणचा मेनू
भात आणि दह्याची कडी. जेवण लवकर करून सर्व झोपायची तयारी करत होते. अरुणसर,
प्रसाद, साबळेमामा, गोपाळमामा,
सावळाराम आणि बजरंग हे चुलीच्या बाजूला झोपले होते. प्रकाशसर,
झेन, राज, कुणाल आणि मी
थोडे खालच्या बाजूला झोपलो होतो. काल रात्रीच्या थंडीच्या अनुभवामुळे आज सर्वानी
अंगावर जेवढे म्हणून कपडे होते तेवढे चढविले. त्यामुळे थंडी फारशी लागली नाही.
आम्हाला थंडी वाजत नव्हती हे अरुण सरांना संगितले पण हे काही त्यांना पटेनाच....!!
दोरावरून सर्वप्रथम
ऱ्यापलींग करीत साबळे मामा उतरले. त्यांच्या मागोमाग अरुण सर, प्रसाद, मी,
झेन, कुणाल, सावळेराम,
बजरंग, गोपळ मामा, राज
अन शेवटी प्रकाश सर हा क्रम शेवटपर्यंत राहिला. लगेच १५ मिनटात दुसरा कातळ ३५ -४०
फूटाचा होता. प्रसाद पहिल्यांदा खाली उतरला त्यांच्या मागोमाग अरुणसर खाली उतरूले.
त्या ठिकाणी त्यांना पाण्याचा छोटासा खड्डा दिसला. पण तो मातीने भरून गेला होता.
सरांनी लगेच तो साफ करून ठेवला. त्यांच्या मागून येणाऱ्यांसाठी पाण्याची सोय झाली
होती. कुणालने छान डोके लढविले. त्याच्या बाटलीतली स्ट्रो काढून त्याने अगदी मजेत
पाणी पिले. सर्वांनी त्याचे अनुकरण केले.
तोपर्यंत अरुणसरांनी तिसऱ्या कड्यावरून दोर सोडला होता २० आणि ३० फूट असे दोन टप्प्यांमध्ये खाली उतरायचे होते. मागील मंडळी खाली उतरेपर्यंत आम्ही पुढे चालू लागलो. ३५० फुटांचा दोर प्रसादने माझ्याकडे दिला. मी व प्रसादाने आळीपाळीने तो दोर घ्यायचे ठरविले होते. त्यामुळे प्रसाद पुढे आणि मी प्रसादच्या मागून चालत होतो. लगेच चौथा कातळ लागला जो २० फूट होता थोडा ओलसरसा होता. प्रसादच्या मागोमाग मी खाली उतरलो. अरुण सर खुश दिसत नव्हते. कारण त्यांना हवा तसा खोल कडा अजून लागत नव्हता. खरे आहे ते ... वाघाला गवत खायला दिल्यासारखेच ते छोटे छोटे प्याच होते.
तोपर्यंत अरुणसरांनी तिसऱ्या कड्यावरून दोर सोडला होता २० आणि ३० फूट असे दोन टप्प्यांमध्ये खाली उतरायचे होते. मागील मंडळी खाली उतरेपर्यंत आम्ही पुढे चालू लागलो. ३५० फुटांचा दोर प्रसादने माझ्याकडे दिला. मी व प्रसादाने आळीपाळीने तो दोर घ्यायचे ठरविले होते. त्यामुळे प्रसाद पुढे आणि मी प्रसादच्या मागून चालत होतो. लगेच चौथा कातळ लागला जो २० फूट होता थोडा ओलसरसा होता. प्रसादच्या मागोमाग मी खाली उतरलो. अरुण सर खुश दिसत नव्हते. कारण त्यांना हवा तसा खोल कडा अजून लागत नव्हता. खरे आहे ते ... वाघाला गवत खायला दिल्यासारखेच ते छोटे छोटे प्याच होते.
मी माझ्याकडची अंड्याची भूर्जी, कोथिंबीर वडी, बटाट्याची भाजी, टोम्याटो सॉस, ब्रेड काढला. साबळे मामांनी
गव्ह्च्या पिठाच्या गुळ टाकून गोड भाकऱ्या आणल्या होत्या. प्रकाश सरांनी थेपले
काढले. अरुण सरांनी मस्तपैकी मांदेली तळून आणली होती. ते प्रत्येक मोहिमेला तळलेली
मच्छी आणतातच. मागे कुरंग,मदन,अलंग,रतनगड ट्रेकला त्यांनी तळलेली पापलेट, हलवा व
सुरमई आणली होती. आमची चांगलीच मजा झाली. पण आज मात्र मला जेवण गोड लागत नव्हते.
कारण जर का दोर खाली पोहोचला तर मला व प्रसादला गिर्यारोहण सोडावे लागणार
होते.....!
जेवण झाले....! मी
खूप आतुर होतो तो दोर नक्की खाली जाणार की नाही हे बघायला. अरुण सरांनी दोर
दगडाच्या आतल्या बाजूने खाली सोडला तेव्हा तो खाली जमिनीला सहज टेकला. झाले ...
आम्ही हरलो होतो. प्रकाश सर म्हणाले "अरे ज्याचे आयुष्यच सह्याद्रीत गेले
त्याचेशी काय च्यालेंग लावता." झाले आता आम्हाला सर्वजण चिडवू लागले.
त्या कड्याखाली समोरच वेगळा असा एक १०० फुटांचा अजिक्य सुळका दिसत
होता. जो अजून पर्यंत कोणीच सर् केलेला नव्हता. आम्ही सर्वजण तो शेवटचा कडा उतरलो.
सुळक्याचे नीट निरीक्षण केल्यावर साबळेमामांनी त्याचे नामकरण केले
"रांजण".. सर अगदी रांजणा सारखाच दिसतो बघा. बहुतेक फेब्रुवारीत येऊया
याच्यावर चढाई करायला, अरुणसर म्हणाले.
मुख्य घळ संपून आता tree
line सुरु झाली. आता फक्त नदीच्या कोरड्या पात्रातून खाली खाली
उतरयाचेच होते. अरुण सरांनी प्रसाद, साबळे मामा, गोपाळ मामा, बजरंग, सावळेराम
यांना पाण्याचे ठिकाण शोधण्यासाठी पुढे पाठविले. मीही त्यांना गाठण्यासाठी भरभर
चालू लागलो. पण माझ्याकडे ३५० फुटांचा वजनदार दोर होता. त्यामुळे जमत नव्हते.
तासभर चालल्यावर एके ठिकाणी प्रसाद बसलेला दिसला. मागची मंडळी खूप मागे राहिल्याचे
त्याला वॉकी टोकि वरून कळाले. मी म्हटले तू इथेच थांब. अजून अंधार पडायला पंधरा
मिनिटे आहेत. तोवर पुढे जाऊन पाणी सापडते काय मी बघतो. कारण पाणी मिळाले नाही तर
आपले चांगलेच हाल होणार होते. कारण दुसरे दिवशी आम्हाला अजून एका नवीन वाटेचा शोध
घ्यायचा होता.
प्रसाद कडे मोठा
दोर सोडून मी व गोपाळमामा धावतच निघालो. आमच्याकडे वेळ फारच थोडा शिल्लक होता.
बरेच अंतर धावल्यावर नदीमध्ये एके ठिकाणी पाण्याचा साठा दिसला अन आम्ही दोघेही खूष
झालो. अगदी जीवाच्या आकांताने ओरडून आम्ही मागच्यांना पाणी सापडल्याचे सांगितले.
खरंच .. पाणी म्हणजे जीवन ... पाणी म्हणजे जीवन....!!
आता पूर्णपणे अंधार पडला होता. प्रकाशसर, राज, झेनोष खूपच मागे होते. सुदैवाने त्यांचेकडे वॉकी टोकि होता त्यामुळे चिंता करण्याचे कारण नव्हते. तरी मी व प्रसाद त्यांना आणण्यासाठी उलटे निघालोच. तसे एवढी मोठाली दरी एका दिवसात उतरून सर्वजण चांगलेच दमले होते. साडेचार हजार फुटांवरून आम्ही नऊशे फुटांवर आलो होतो.साधारण २० ते २५ मिनटातच त्यांची भेट झाली. पाण्याच्या जवळ जाईपर्यंत अरुण सरांनी दोन चुली पेटवून अवघ्या एका तासातच साग्रसंगीत जेवण तयार केल होत. आल्या आल्या गरम गरम चहा मिळाला. नंतर थोड्या गप्पा व दुसरे दिवशीची आंखणी झाली. झेनोश ने आम्हाला GPS ची छान माहिती दिली. या मोहिमेत आमच्याकडे दोन GPS होते. एक अरुणसरांचा व दुसरा झेनोशचा.
आता पूर्णपणे अंधार पडला होता. प्रकाशसर, राज, झेनोष खूपच मागे होते. सुदैवाने त्यांचेकडे वॉकी टोकि होता त्यामुळे चिंता करण्याचे कारण नव्हते. तरी मी व प्रसाद त्यांना आणण्यासाठी उलटे निघालोच. तसे एवढी मोठाली दरी एका दिवसात उतरून सर्वजण चांगलेच दमले होते. साडेचार हजार फुटांवरून आम्ही नऊशे फुटांवर आलो होतो.साधारण २० ते २५ मिनटातच त्यांची भेट झाली. पाण्याच्या जवळ जाईपर्यंत अरुण सरांनी दोन चुली पेटवून अवघ्या एका तासातच साग्रसंगीत जेवण तयार केल होत. आल्या आल्या गरम गरम चहा मिळाला. नंतर थोड्या गप्पा व दुसरे दिवशीची आंखणी झाली. झेनोश ने आम्हाला GPS ची छान माहिती दिली. या मोहिमेत आमच्याकडे दोन GPS होते. एक अरुणसरांचा व दुसरा झेनोशचा.
भात, फ्लोवर-मटारचा रस्सा, थेपले, चपाती, पापड, लोणचे अन तळलेली मांदेली. बेत चांगलाच जमला होता. आज झोपही मस्त लागणार होती. साडे चार हजार फुटांवरून आम्ही नऊशे फुटांवर येवून थडकलो होतो. त्यामुळे थंडीही कमी भासत होती. नदीच्या पात्रात आमच्यातील काहीजण झोपले तर पात्राच्या बाहेरच्या बाजूला सपाटीवर आम्ही कालची मंडळी झोपलो. रात्रीच्या त्या अंधारामध्ये वरती चांदण्याणकडे टक लावून बसायला मला फार आवडते. मी तरी तेच करत होतो. मोबाईल वरती काही मराठी अप्रतिम गाणी चालू होती ... अशा एकांतात भावगीते ऐकण्याची मजा काही औरच असते....!!
तिसरा दिवस उजाडला सकाळी ७:३०
वाजले, तेव्हा अरुण सर माझ्या नावाने ओरडत होते.
मटार-बटाट्याची भाजी व पिठले ठेवायला त्यांना माझ्याकडचा रिकामा डबा हवा होता. पण
माझी काही झोप उडत नव्हती. तसा मी सकाळच्या झोपेसाठी आळशी आहे...! चुलीवरच्या
उकळत्या चहाचा स्वाद नाकात शिरला अन मी तात्काळ उठलो. मस्त चहा-बिस्कीटाचा अन
फरसाणचा स्वाद घेतला. एरवी मी घरी कधीच चहा घेत नाही. फक्त ट्रेकिंगला गेल्यावरतीच.सर्व
सामान आवरायची तयारी जोरात चालू होती. अरुणसरांनी सांगितले "आपल्याला आज खूप
घाई करावी लागणार आहे. सामारदला लवकरात लवकर पोचायला हवे. आपल्याला तो पुरातन
रस्ता शोधून काढावा लागणार आहे. तेव्हा लवकर आवरा".
सर्वांचे सामान आवरले तरी माझे आपले चालूच होत. नाहीतरी मला दरवेळी उशीरच होतो. अरुणसरांच्या शिव्या खाल्ल्याशिवाय मलाही चैन पडत नसावी. झेनच्या बोलण्यावरून आम्हाला अजून २००० फूट वरच्या बाजूला जायचे होते. GPS चा ट्रेकिंग मध्ये खूपच फायदा होतो हे जाणवले. घ्या घळीतून १२ पायऱ्याचा रस्ता गेला होता ती घळ गोपळ मामांना ठावूक होती. कात्राबाईच्या माथ्यावरून त्यांनी ती आम्हाला दाखविली होती. नदीच्या डाव्या अंगाने बऱ्याच घळी वर जात होत्या. पण आम्ही ती शोधून काढलीच अन डाव्या हाताला जंगलात घुसलो. अरुण सरांचा उजवा पाय चांगलाच दुखत होता. काल उतरताना तो मुरगळला होता. त्यामुळे त्यांनी मला संगितले की आपल्याला वाट शोधायची आहे. तू व प्रसाद डाव्या अंगाने कारवीतून वाट काढत वर वर सरका. आम्ही उजव्या बाजूने वर जातो. चुकलो तरी आपल्या जवळ वॉकी टोकि आहेतच. तुम्ही चुकले तर तुम्ही गिर्यारोहण सोडायचे. आम्ही चुकलो तर आम्ही सोडू. आम्ही म्हटले चालेल सर ...!
वाट अशी नव्हतीच. प्रसादकडे दोर असल्याकारणाने त्याचे चांगलेच हाल होत होते. साधारण दीड तासानी आम्ही दोनही ग्रुप एकत्र भेटलो. तिथे सर्वांनी थोडा वेळ आराम केला आणि संत्री खाल्ली अरुण सरांनी ४-५ लिटर पाणी घेऊन लिंबू सरबत बनविले. आम्ही प्रत्येकी ४.५ ग्लास लिंबू-सरबत प्यालो. समोरच आम्हाला ती खिंड दिसत होती. आत्ता बराचसा पल्ला आम्ही गाठला होता. जुनी वाट असल्यासारखी जाणवत होती. पण बरीच वर्षे रस्ता तुटला होता.
अर्ध्या तासामध्ये आम्ही खिंडीच्या तोंडाला जाऊन पोहोचलो अन खूप आनंद वाटला. समोर रतन गडाची भिंत दिसत होती. "त्या तिथे डाव्या अंगाला रतन गडाच्या तुटलेल्या पायऱ्या आहेत. जिथून चार वर्षांपूर्वी आम्ही दोर लावून राय्पलिंग केले होत. ही १२ पायऱ्यांची वाट तिथेच जावून पोहोचते. आपण अगदी बरोबर आलोत" अरुण सरांनी माहिती दिली अन सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधान पसरले.
इथून पुढची वाट सपाटीची होती. रतन गडाला उजव्या अंगाला ठेवत traverse मारत मारत जायचे होते. अर्ध्या तासाने एका माळरानावर पोहोचलो. तिथून आजोबा, सीतेचा पाळणा, डेहेणे, साकुर्ली गावे दिसली. हे सर्व दुष्य बघण्या लायक होते. थोड पुढे चालत गेल्यावर घळीमध्ये छानपैकी वाहते पाणी मिळाले. तिने जेवण करायचे ठरले. तिथून “बाण“ ह्या सुळक्याचे प्रथम दर्शन झाले. त्या सुळक्या विषयी बरेच ऐकले होते. पण प्रथमच पहात होतो. राज बाकरे म्हणाला की सर या सुळक्यावर चढाई करण्याची खूप खूप इच्छा आहे. केव्हा जायचे बोला. "मी पण येणार तुमच्या बरोबर" मी लगेच माझी सीट बुक केली. अरुणसर म्हणाले "अरे काल तुम्ही पैज हरला आहात हे विसरलात काय ... या ट्रेक नंतर गिर्यारोहणाला सोडा चिठ्ठी देणार असे तुम्हीच कबुल केले होते. त्याचे काय?" त्यावर प्रकाश सरांनी सांगितले "टीव्ही वर जसे हरलेल्यांना "call back round" ला बोलावतात तसे आपण यांनाही बोलवूया. जाऊंदे, लहान मुले आहेत. एक संधी देऊया". अरुणसर आम्हाला म्हणाले "चलो तुमको छोड दिया" Thanks to Prakash sir....!
पाण्यापाशी जेवण उरकून घेतले. मी खास तिसरया दिवसासाठी शिल्लक ठेवलेल्या कोथंबीरीच्या वड्या काढल्या. थेपले, पिठले, मटार-बटाट्याची भाजी, ब्रेंड आणि सॉस. जेवण झाल्यानंतर दहा मिनिट आराम केला. समोरच सामरद गाव दिसत होते. तेव्हा तीन वाजले होते. मला तर लवकर निघायचय होते. कारण भांडारदरा पर्यंतचा रोड थोडा खराब होता. तो दिवसा उजेडी पार करणे महत्वाचे होते. परत एकदा बाण सुळक्याने खतरनाक दर्शन दिले. राजच्या सांगण्यावरून सुप्रसिद्ध प्रस्तरारोहक “किरण आडफडकर” सर यांनी तो सर केला होता. चार वाजता आम्ही सामरद गावात पोहोचलो. प्रत्येकाने आपापल्या sack मधली equipment काढून अरुणसरांच्या गाडीत भरली अन यशवंताकडचा चहा पिउन गाड्या मुंबईच्या दिशेने दामटल्या. रात्री १० च्या सुमारास आम्ही सर्व मुंबईमध्ये सुखरूप पोहोचलो.
हे सर्व शक्य झाले त्यामध्ये महत्वाचा वाटा होता अरुणसर, प्रकाशसर, राज बाकरे, झेनोश पटेल, प्रसाद सामंत, कुणाल आंबेरकर आणि मी. त्याचबरोबर सामरदचे गोपाळमामा, सावर्णेचे साबळेमामा, पांचनईचे सावळेराम व बजरंग हे गावकरीही या अनोख्या मोहिमेत सामील झाले होते. आतापर्यंतच्या अरुण सरांबरोबर मी भाग घेतलेल्या शोधमोहिमांमधील हा सर्वात मजबूत संघ होता .... !!
“अगर तुम सच्चे दिलसे किसिको पाना चाहते हो, तो पुरी कायनात तुम्हारी मदत मे लग जाती है”
“When you really want something to happen, the whole world conspires to help you to achieve it”
Details:..................
Samrad - 747 mtrs (2450 feet).....................
Kathra pass top 1218 mts - (3996 feet) ..........................
Campsite 1374 mts - (4507 feet) ..........................
1st rappel start point 1355 mts - (4445 feet).....................
2nd rappel start pt 1289 mts - (4229 feet) ..........................
3rd rappel start 1214 mts - (3982 feet) ..........................
3rd rappel end 1192 mts - (3910 feet) ..........................
4th rappel end 1182 mts- (3877 feet) ..........................
5th rappel sttart 986 mts - (3234 feet) ..........................
5th rappel end 963 mts - (3159 feet) ..........................
Nite camp - 292 mts - (958 feet) ..........................
Bara Pairacha rasta top 879 mts - (2883 feet).......................................







































